Lok Shahi Times https://lokshahitimesnews.com Lok Shahi Times News Tue, 12 May 2026 12:13:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 जालना शहरातील पावसाळी समस्यांवर आमदार अर्जुन खोतकर व मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची महत्त्वपूर्ण बैठक https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae/ Tue, 12 May 2026 06:21:35 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2646

Jalna : जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास | आज जालना महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर जालना शहरातील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील ड्रेनेज लाईन नियोजन, पावसाळ्यात विविध भागांत पाणी साचणे, ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीत जालना शहरातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील प्रलंबित कामे, पावसाळ्यातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यासंदर्भात आयुक्तांसमोर मते मांडली.आमदार अर्जुन खोतकर यांनी शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल खोतकर, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक संजय डुकरे पाटील, नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक योगेश भगत, नगरसेवक अश्विन आंबेकर तसेच मनपाचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हाही बैठक जालना शहराच्या विकासासाठी व पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

]]>
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” सेवली–नेर मार्गावर नागरिक हैराण, जीव मुठीत धरून प्रवास! https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%8d/ Wed, 22 Apr 2026 12:45:18 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2639

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जालना जिल्ह्यातील सेवली ते नेर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल अक्षरशः शब्दात मांडता येणार नाहीत. “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, वाहन चालवताना चालकांना प्रत्येक क्षणी अपघाताची भीती सतावत आहे. दुचाकीस्वार तर सर्वाधिक त्रस्त असून, अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

दररोज शाळकरी विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, तसेच रुग्णवाहिका या मार्गावरून जात असतात. मात्र खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्ता दुरुस्तीचे काम फक्त कागदावरच होते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Facebook Channel Link https://www.facebook.com/share/v/14gYmPWpE8u/

तात्काळ उपाययोजना केली पाहिजे अशी नागरिकांच्या वतीने मागणी केली जात आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

]]>
रामनगर (जालना) येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पार पडले. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8/ Sat, 18 Apr 2026 15:03:58 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2632

जालना शहरातील रामनगर येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.

आज आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “संपर्क कार्यालय हे केवळ पक्षाचे केंद्र नसून सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी आमदार खोतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी अधिक जवळीक साधता येईल आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यास गती मिळेल, असे मत मांडले.

कार्यक्रमाला शिवसेना संपर्कप्रमुख पंडित दादा पाटील, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, किशोर पांगरकर, संजय डुकरे पाटील तसेच नजीर भाई, डॉ. नेमाने, मुसा परसुवाले, इरशाद भाई, विजयाताई चौधरी, उज्वलाताई खोकल्या, हरीश देवावाले, जावेद भाई, जबर भाई, स्वप्निल हिवराळे, फकीरा वाघ, सुशील भावसार, भोला कांबळे, लखन कनिसे, संतोष रासवे, नरेश भैया, खुद भैय्या, स्वप्नील घुले, दीपक हवाले, सखाराम लंके आदींसह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्घाटन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला असून, या संपर्क कार्यालयामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

]]>
पुण्यातून खास मतदानासाठी अंबडला आलेल्या तरुणाचा आरोप : “माझ्या नावाने आधीच बोगस मतदान!” https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ Tue, 02 Dec 2025 09:37:10 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2620

लोकशाही टाईम्स – विशेष रिपोर्ट अंबड | अंबड नगरपरिषद मतदार प्रकरण 🗳 पुण्यातून खास मतदानासाठी अंबडला आलेल्या तरुणाचा आरोप : “माझ्या नावाने आधीच बोगस मतदान!”अंबड – लोकशाहीच्या महत्त्वाच्या उत्सवाला आज सकाळी गंभीर धक्का बसला, जेव्हा पुण्यात कार्यानिमित्त राहत असलेले आनंद बळीराम शिंदे नावाचे तरुण मतदार केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मूळ गावी अंबड येथील मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांना “तुमचे मतदान आधीच झाले आहे” असे सांगण्यात आले आणि तेथूनच गोंधळाची सुरुवात झाली.📍 “मी अजून मतदानच केलेले नाही… मग माझे नाव कोणी वापरले?” – शिंदे यांची प्रतिक्रिया आनंद शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या नाराजीचा कडाडून उल्लेख केला. ते म्हणाले—> “मी सकाळपासून फक्त मतदान करण्यासाठी पुण्यातून अंबडला आलो आहे. माझ्याकडे माझे मतदार कार्ड आहे. पण मी मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच कोणीतरी माझ्या नावाने बोगस मतदान केलं आहे. माझ्या हातावर कुठेही शाई नाही, मग मतदान केल्याचे कसे म्हणतायत?”**त्यांनी स्वतःचा हात दाखवत स्पष्ट केले की, त्यांच्यावर मतदानाची शाई नसताना अधिकारी त्यांचे मतदान झाल्याचे सांगत आहेत हे अत्यंत संशयास्पद आहे.📍 अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया : “वरिष्ठ येतील, थांबा”**या प्रकरणाबाबत चौकशी करताच उपस्थित मतदान अधिकाऱ्यांनी शिंदे यांना थांबण्यास सांगितले व वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे सांगितले.मात्र शिंदे यांना दीर्घकाळ थांबणे शक्य नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रीय व संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते संतप्तपणे म्हणाले—E> “इथे काय व्हेरिफाय करत आहात? मी अजून मतदान केलेलंच नाही. मग माझं मतदान झालं कसं दाखवताय?”📍 निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेवर मोठा प्रश्न या घटनेमुळे मतदान केंद्रातील व्यवस्थापन व सुरक्षेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.मतदारांच्या ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले असून, बोगस मतदानावर नियंत्रण ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.📍 स्थानिक नागरिकांचाही संताप या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “जर स्वतःची ओळखपत्र आणि हातावर शाई नसतानाही मतदान झालं दाखवलं जात असेल, तर खरे मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 📍 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची नोंद घेतली जाण्याची शक्यता असून बोगस मतदान करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज, मतदान नोंदी आणि संबंधित अधिकाऱ्यांचे निवेदन तपासले जाणार असल्याची चर्चा आहे.

🔚 लोकशाही टाईम्स निष्कर्ष बोगस मतदानाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी अशा घटनांवर तात्काळ व कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.आनंद शिंदे यांचे प्रकरण हे मतदान व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.🗳 लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी ‘खरे मतदार – खरे मतदान’ याची काळजी प्रशासनाने तत्परतेने घ्यावी, हीच नागरिकांची अपेक्षा.

]]>
प्रभाग ७ मध्ये दिवाळी किट वाटप युवासेना “शहरप्रमुख कमलेश खरे यांचा उपक्रम — स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटला” https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/#comments Wed, 05 Nov 2025 11:18:55 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2607

जालना जिल्हा प्रतिनिधी -: आज प्रभाग ७ मध्ये दिवाळी किट वाटप युवासेना “शहरप्रमुख कमलेश खरे यांचा उपक्रम — स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटला”प्रभाग क्रमांक 07 युवासेना शहरप्रमुख कमलेश खरे यांच्या वतीने स्वच्छता कामगारांना दिवाळीनिमित्त किराणा किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित स्वच्छता कर्मचारी व प्रभाग क्रमांक ०७ मधील नागरिकांशी बोलताना युवासेना शहरप्रमुख कमलेश खरे म्हणाले की, आपल्या प्र.क. ०७ प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरता मी सदैव तत्पर आहे व आपला प्रभाग विविध उपक्रम राबवून आपल्या प्रभागाला प्रगतीच्या दिशेने निघण्यासाठी मी विकास आराखडा तयार केला आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाला नरेशभैया खुदभय्ये, स्वच्छता निरीक्षक अमजद खान, करण मगर पाटील, कैलाश खताळे, विशाल जाधव पाटील, महेश शिंदे पाटील, आकाश खरे तसेच सर्व स्वच्छता कर्मचारी व प्रभाग क्रमांक सात मधील महिला भगिनी व पुरुष मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थित होते

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ad-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/feed/ 2
पुसेगाव सर्कलमध्ये शिवसेना पक्षाकडून गजानन पोहकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/#respond Sun, 02 Nov 2025 12:37:45 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2599

आज पुसेगाव सर्कलमध्ये लहान मूल असो वा वृद्ध नागरिक — “गजानन भाऊ” हे नाव परिचयाचं झालं आहे. त्यांच्या नावाभोवती लोकांचा आत्मीयतेचा भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षाने गजानन पोहकर यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास, त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे.येत्या निवडणुकीत पुसेगाव सर्कलमधील राजकारणात गजानन पोहकर हे एक निर्णायक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते सर्कलमधील राजकीय समीकरणांमध्ये एक महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

गेल्या काही वर्षांत त्यांनी सर्कलमधील गावोगाव फिरून नागरिकांच्या समस्या ऐकल्या, शेतकरी आणि तरुणांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शक्य तेथे मदत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यामुळे त्यांनी केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही आपले स्थान निर्माण केले आहे.स्थानिक नागरिक सांगतात की, “गजानन भाऊ हे नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. त्यांनी कुणाचं दार बंद केलेलं नाही. आज सर्कलमधील प्रत्येक घरात त्यांचं नाव घेतलं जातं.”अनेक तरुणांनी त्यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत राजकारणात आणि सामाजिक कामात पाऊल टाकलं आहे.शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही गजानन पोहकर यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचा जम बसलेला जनसंपर्क, विनम्र स्वभाव आणि पक्षनिष्ठ कार्यपद्धती पाहता वरिष्ठ पातळीवरही त्यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, गजानन पोहकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण त्यांनी केवळ राजकीय पातळीवर नव्हे, तर सामाजिक स्तरावरही विश्वास निर्माण केला आहे. त्यांची लोकांशी असलेली थेट नाळ, प्रत्येक घटकांशी असलेला संपर्क आणि प्रामाणिक कार्य हे त्यांचे मुख्य बळ आहे.आज पुसेगाव सर्कलमध्ये लहान मूल असो वा वृद्ध नागरिक — “गजानन भाऊ” हे नाव परिचयाचं झालं आहे. त्यांच्या नावाभोवती लोकांचा आत्मीयतेचा भाव दिसून येतो. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षाने गजानन पोहकर यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास, त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87/feed/ 0
भाजप कार्यालय बदनापूर 📌भाजप – शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती संदर्भात दुसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चा पार पडली. https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%f0%9f%93%8c%e0%a4%ad/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%f0%9f%93%8c%e0%a4%ad/#comments Sun, 26 Oct 2025 11:45:25 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2586

बदनापूर, दि. 26 ऑक्टोबर: बदनापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज महत्त्वपूर्ण राजकीय बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात दुसऱ्या फेरीत अत्यंत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

या बैठकीस शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर, भाजप जिल्हाअध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद (अण्णा) चव्हाण, माजी आमदार शिवाजीराव चौथे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले मेघराज चौधरी, कैलास मदन, कोलते पाटील आदि तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत तिन्ही पक्षांच्या सुसंवाद व समन्वय साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीच्या माध्यमातून एकत्रित लढा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या चर्चेत मतदारसंघातील रणनीती, जागा वाटप,कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि स्थानिक नेतृत्वाचे योगदान या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.बैठकीनंतर बोलताना नेत्यांनी सांगितले की, “जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या गतीसाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन मजबूत युती उभारण्याच्या दिशेने ही चर्चा सकारात्मक टप्प्यात पोहोचली आहे.”

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%f0%9f%93%8c%e0%a4%ad/feed/ 1
पातुर्डा येथे शेतकरी–शेतमजूरांची राज्यव्यापी परिषद; सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त — “शेतकरी धर्म” पाळण्याचं आवाहन https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/#respond Tue, 21 Oct 2025 08:06:03 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2576

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी : पातुर्डा येथे झालेल्या शेतकरी–शेतमजूरांच्या राज्यव्यापी परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि विविध जिल्ह्यांतील नेते उपस्थित होते. या परिषदेला उपस्थित राहून मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जोरदार इशारा दिला.परिषदेत वक्त्यांनी सांगितलं की, “हे सरकार म्हणजे आदानी–आंबानींचं सरकार आहे. अंबानींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मात्र बॅनरपुरता मर्यादित आहे.” आज दिवाळी असूनही शेतकऱ्यांच्या घरात काळी दिवाळी साजरी होत असल्याचं सांगत वक्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “जाहीर केलेले निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास सरकारची राजकीय दिवाळी कायमस्वरूपी काळी करु,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.वक्त्यांनी पुढे सांगितलं की, “शेतकऱ्यांनी आता ‘शेतकरी धर्म’ पाळायला हवा. महाराष्ट्रात जाती–धर्मांमध्ये फूट पाडून जनतेचं लक्ष मुख्य प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आता शेतकरी एकत्र आला पाहिजे, अन्यथा ही व्यवस्था संपणार नाही

सरकार ओबीसी, मराठा, दलित किंवा आदिवासींचं असल्याचं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात हेच समाज सर्वाधिक आत्महत्या करत आहेत, अशी खंत व्यक्त करण्यात आली. “परभणी जिल्ह्यातील सचिन आणि ज्योती या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुली मामाकडे राहतात. दरवर्षी २००० शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण सरकार फक्त घोषणा करतंय,” असा आरोप वक्त्यांनी केला.धारावीची ६०० एकर जमीन उद्योगपतींना दिली जात असल्याचं सांगत, “शेतकऱ्यांना काय मिळतंय?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. भूमिहीन शेतमजुरांच्या नोंदीच होत नाहीत, त्यांच्या नुकसानीचा आकडाही सरकारकडे नसल्याची टीका करण्यात आली. “जनावरांची नोंद होते, पण शेतमजुरांची नाही — इतकं शेतमजूरविरोधी सरकार आहे,” असं वक्त्यांनी म्हटलं.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी वसुली अधिकारी आणि बँका जबाबदार असल्याचं सांगत वक्त्यांनी इशारा दिला की, “यापुढे वसुलीसाठी अधिकारी आला, तर त्याला ‘पॅंथर स्टाईल’ उत्तर दिलं जाईल.”परिषदेतील वक्त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांना आत्महत्येचा विचार न करता आक्रमक लढा देण्याचं आवाहन केलं. “आता कुणीही फाशी घ्यायची नाही; हा लढा आता अस्तित्वाचा आहे,” असं सांगण्यात आलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पातुर्डा गावाला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत, “ज्या विहिरीवर ते आले होते, तिथे राष्ट्रीय स्मारक उभारावे,” अशी मागणीही यावेळी करण्यात आली. प्रत्येक सरकारने केवळ आश्वासनं दिली पण काम केलं नाही, त्यामुळे यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धारही करण्यात आला.“दलित–आदिवासी–शेतकरी कुणीही सुरक्षित नाही,” असं सांगत बोंडआळी मुक्तीसाठी चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची मागणीही परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. “हे सरकार शेतकऱ्यांचं नाही — उद्योगपतींचं आहे,” असा आरोप यावेळी पुन्हा करण्यात आला.“लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा जनउठाव आणि उद्रेक झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही,” असा स्पष्ट इशारा परिषदेतील नेत्यांनी दिला. तसेच आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला “शेतकरी धर्म” दाखवावा, असं आवाहनही करण्यात आलं.या परिषदेला माजी मंत्री बच्चुभाऊ कडू, माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, स्वराज्य पक्षाचे राज्याध्यक्ष प्रशांत डिक्कर, राज्य उपाध्यक्ष गजाननराव बंगाळे पाटील, राज्य सरचिटणीस जितेशभाई जगताप, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी, विदर्भ युवक अध्यक्ष संकेत जाधव, विदर्भ समन्वयक गणेश सहस्त्रबुद्धे, अकोला जिल्हाध्यक्ष परवेज खान आदी मान्यवर उपस्थित होते.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4/feed/ 0
आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/#respond Tue, 21 Oct 2025 07:46:32 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2572

आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !प्रकाशाचा हा पावन सण आपल्या जीवनात आनंद, उत्साह आणि नवचैतन्याची ज्योत प्रज्वलित करो. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. दिव्यांच्या प्रकाशात अंधार नाहीसा होवो, मनातील निराशा दूर होवो आणि नवीन उमेद, आशा आणि यशाची किरणे आपल्या आयुष्यात पसरू देत.अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना !शुभ दिपावली 🪔-

कृषी उत्पन्न बाजार समिती जालना

प्रकाशाच्या या सणाने आपल्या जीवनात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि समाधान घेऊन यावे हीच शुभेच्छा!आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा – मनोज जरांगे पाटील, अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/feed/ 0
जालना जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नवीन दम — संजय खंदारे, रमेश सदावर्ते आणि कैलास पवार यांचा जाहीर पक्षप्रवेश https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be/ https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be/#respond Tue, 21 Oct 2025 03:26:58 +0000 https://lokshahitimesnews.com/?p=2565

जालना : सेवली (ता. जालना) येथील प्रतिष्ठित व जनसंपर्क असलेले राजकारणी संजय खंदारे, रमेश सदावर्ते आणि कैलास पवार यांनी आज मोठ्या उत्साहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेना उ.बा.ठा पक्षाला स्थानिक पातळीवर बळकटी मिळणार आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना (उ.बा.ठा) जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी भूषविले. त्यांच्या उपस्थितीत तिन्ही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्वजाला निष्ठा अर्पण करत पक्ष प्रवेश केला.कार्यक्रमात जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,> “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा लोकशाही, विकास आणि विचारांचा पक्ष आहे. पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात खरी शिवसेना पुन्हा उभी राहत आहे. आज पक्षात सहभागी झालेले कार्यकर्ते निश्चितच पक्षाला अधिक बळ देतील.”

या प्रवेशामुळे जालना सेवली परिसरातील शिवसेनेला नवे बळ आणि नवचैतन्य मिळाले आहे.

]]>
https://lokshahitimesnews.com/uncategorized/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be/feed/ 0