

जालना जिल्हा प्रतिनिधी सय्यद इलियास : जिल्हा प्रशासनात खळबळराज्यातील भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया अधिक तीव्र करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी मोठी कारवाई केली. जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू उत्खनन प्रकरणातून कारवाईमिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन व ट्रक सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा लावण्यात आला. कारवाईदरम्यान विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर येथील विजय चव्हाण यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. सापळ्यादरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये चर्चांना उधाण आले आहे.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईनंतर आवश्यक पुरावे जप्त केले असून संबंधित पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे धाड टाकून एका पोलीस अंमलदाराला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यामुळे एका दिवसात दोन वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवायांनी भ्रष्टाचारविरोधातील एसीबीची मोहीम आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात एसीबीकडून सातत्याने सापळे रचून लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर झालेली ही कारवाई जालना जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या लाचखोरीच्या कारवायांपैकी एक मानली जात आहे, काही महिन्यापूर्वी जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एका बांधकाम ठेकेदाराकडून 10 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते, आणि आता हे तहसीलदार विजय चव्हाण अडकले या मुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्येही या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाद मिटवणारा तहसीलदार, गोरगरिबांना मदत करणारा तहसीलदार, पूर आल्यावर पुराच्या पाण्यात स्वतः पूर्वग्रस्तांना अन्न पुरवणारा तहसीलदार आज लाच खोरीत अडकल्याने विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.





